*विद्यार्थी_दिवस*
दिवस ७ नोव्हेंबर -सम्पूर्ण माहिती
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळाप्रवेशाचा ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये "विद्यार्थी दिवस"म्हणून साजरा केला जाणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या संदर्भातील परिपत्रक काढले आहे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
शासन निर्णयानुसार सर्व शाळेत हे दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करायचा आहे तरी खालील माहिती आपणास नक्कीच उपयोगी पडेल●
➤ बाबासाहेब सुविचार - संग्रह

➤ बाबासाहेब भाषण- मराठी

➤ बाबासाहेब भाषण - हिंदी

➤ बाबासाहेब भाषण- इंग्रजी

---------------------------------------------------------------------
*७_नोव्हेंबर*
*डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन*
शिक्षणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व बाबासाहेबांनी पुरेपूर जाणले होते. केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक आणि खर्या अर्थाने सर्वांगीण उन्नती होते याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच बाबासाहेबांनी *शिका* हा संदेश दिला.हा संदेश केवळ आपल्याच समाजाला दिला असे नव्हे तर जो जो समाज शिक्षणापासून, ज्ञानापासून वंचित आहे, त्या सर्वच समाजाने शिक्षणाचा ध्यास घेऊन ज्ञानी बनावे, प्रज्ञावंत बनावे हा मुख्य उद्देश होता.
*शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे , जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय रहाणार नाही* असे डाॅ बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. बाबासाहेब आजन्म विद्यार्थी म्हणूनच जगले. विद्येचा वसा त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपला. त्यांच्या या विद्वत्तेमूळे जगातील सर्वात मोठे संविधान २ वर्षे ११ महिने १८ दिवस या अल्पकालावधीत पूर्ण करून देशाला बहाल केले व राज्यघटनेचे शिल्पकार ठरले.
स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये समाजात त्यांच्या मुळेच रुजू शकली. त्यांचा शाळा प्रवेश एक महत्वपूर्ण व ऐतिहासिक घटना ठरली. *त्या प्रवेशाला आज ७नोव्हेंबरला ११७ वर्ष पूर्ण होत आहेत.*
आजच्या पिढीतील प्रत्येक विद्यार्थी हा देशाचे उज्वल आणि दैदीप्यमान भविष्य आहे. शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग आहे. बाबासाहेबांनी अठरा - अठरा तास अभ्यास केला. कठोर परिश्रम घेतले.त्यांच्या मेहनतीची जाण विद्यार्थ्यांना व्हावी व ते एक आदर्श विद्यार्थी बनावेत या हेतुने *७नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे.*
---------------------------------------------------------------------
![]() |
डॉ.बाबासाहेब आंबेडकर |
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळाप्रवेशाचा ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये "विद्यार्थी दिवस"म्हणून साजरा केला जाणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या संदर्भातील परिपत्रक काढले आहे.
‘विद्यार्थी दिवस’ उपक्रमाअंतर्गत सर्व शाळांमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि काव्यवाचन आदी उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डॉ. आंबेडकर यांचा शाळाप्रवेश दिवस एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे. त्यांच्या शाळाप्रवेशाने ते स्वतः प्रज्ञावंत झालेच आणि कोट्यवधी दलितांचे-वंचितांचे उद्धारकर्तेही झाले. त्यांच्या संविधानामुळे भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्ये रूजू शकली. त्यामुळेच त्यांच्या शाळा प्रवेशाचा दिवस ही महत्त्वाची घटना आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.
विद्यार्थी दिवस
७ नोव्हेंबर १९०० या दिवशी बाबासाहेबांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक, सातारा येथील शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचे नाव भिवा होते. या शाळेच्या रजिस्टरला ‘१९१४’ या क्रमांकासमोर आजही त्यांची स्वाक्षरी असून, हा ऐतिहासिक दस्तावेज शाळा प्रशासनाने जपून ठेवला आहे.●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
शासन निर्णयानुसार सर्व शाळेत हे दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करायचा आहे तरी खालील माहिती आपणास नक्कीच उपयोगी पडेल●
➤ बाबासाहेब सुविचार - संग्रह

➤ बाबासाहेब भाषण- मराठी


➤ बाबासाहेब भाषण- इंग्रजी

---------------------------------------------------------------------
*७_नोव्हेंबर*
*डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन*
शिक्षणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व बाबासाहेबांनी पुरेपूर जाणले होते. केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक आणि खर्या अर्थाने सर्वांगीण उन्नती होते याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच बाबासाहेबांनी *शिका* हा संदेश दिला.हा संदेश केवळ आपल्याच समाजाला दिला असे नव्हे तर जो जो समाज शिक्षणापासून, ज्ञानापासून वंचित आहे, त्या सर्वच समाजाने शिक्षणाचा ध्यास घेऊन ज्ञानी बनावे, प्रज्ञावंत बनावे हा मुख्य उद्देश होता.
*शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे , जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय रहाणार नाही* असे डाॅ बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. बाबासाहेब आजन्म विद्यार्थी म्हणूनच जगले. विद्येचा वसा त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपला. त्यांच्या या विद्वत्तेमूळे जगातील सर्वात मोठे संविधान २ वर्षे ११ महिने १८ दिवस या अल्पकालावधीत पूर्ण करून देशाला बहाल केले व राज्यघटनेचे शिल्पकार ठरले.
स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये समाजात त्यांच्या मुळेच रुजू शकली. त्यांचा शाळा प्रवेश एक महत्वपूर्ण व ऐतिहासिक घटना ठरली. *त्या प्रवेशाला आज ७नोव्हेंबरला ११७ वर्ष पूर्ण होत आहेत.*
आजच्या पिढीतील प्रत्येक विद्यार्थी हा देशाचे उज्वल आणि दैदीप्यमान भविष्य आहे. शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग आहे. बाबासाहेबांनी अठरा - अठरा तास अभ्यास केला. कठोर परिश्रम घेतले.त्यांच्या मेहनतीची जाण विद्यार्थ्यांना व्हावी व ते एक आदर्श विद्यार्थी बनावेत या हेतुने *७नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे.*
---------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment